INDIAN NEWS & TIMES

Wednesday, March 29, 2023

अथर्व फाउंडेशन द्वारा आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यासाठी  स्त्री शक्ती पुरस्कार सोहळा-२०२३ चे आयोजन ‘संकल्पना : श्रीमती वर्षा राणे,  उपाध्यक्षा, अथर्व फाउंडेशन

अथर्व फाऊंडेशनतर्फे अथर्व फाऊंडेशनतर्फे दहिसर, बोरिवली, कांदिवली, आणि मालाड येथील रहिवाशांसाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त १३  मार्च २०२३   रोजी “ स्त्री शक्ती पुरस्कार सोहळा -२०२३”चे आयोजन प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाट्यमंदिर, येथे सायंकाळी ६:३० ते ९ :३० या वेळेत  करण्यात येत आहे. 

कार्येक्रमाची संकल्पना श्रीमती  वर्षा राणे (उपाध्यक्षा, अथर्व फाउंडेशन)  यांची आहे. अथर्व फाउंडेशन  द्वारे  क्रीडा, कला/संस्कृती/सिनेमा, शौर्य, सामाजिक कार्यकर्त्या, पर्यावरण, पर्यटन, शिक्षण, महिला नवोदित, सक्षम आणि स्वयंस्वतंत्र महिला, नागरी सेवा, सशस्त्र सेना इत्यादी श्रेणींमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या  प्रतिभावान,  प्रभावशाली  आणि कर्तबगार  महिलांना  सामाजिक जीवनात एक वेगळा ठसा निर्माण केल्याबद्दल  त्यांचा सत्कार नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीत   करण्यात येईल.

महिलांनी अनेक  अडथळे तोडून आपल्या हक्कांसाठी कठोर परिश्रम केले आणि कला, विज्ञान, कायदा, राजकारण इत्यादी क्षेत्रात प्रगती केली आणि  वैभव प्राप्त करताना पाहिले आहे.   या  महिलांनी महान उंची गाठली आहे आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी त्या  प्रेरणास्थान बनल्या आहेत. अथर्व फाउंडेशन महिलांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीचे कौतुक करते आणि इतरांना त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात उंची गाठण्यासाठी प्रेरित करते.

गौरव   पुरस्कार वितरण सोहळ्यासोबत   सांस्कृतिक कार्यक्रम सादर  करण्यात येईल.भारतीय स्त्रियांचा इतिहास हा  पराक्रमी महिलांनी  भरलेला आहे. 

ज्या महिलांनी केवळ सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीतच नाही तर इतर विविध क्षेत्रात   नाव कमावले आहे अशा महिलांना ओळखून त्यांचा सत्कार करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. हा कार्यक्रम दहिसर , बोरिवली, कांदिवली , आणि मालाड  क्षेत्रातील  महिलांना त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल  पुरस्कार देऊन  सन्मानित करण्यासाठी आयोजित केला आहे. 

अथर्व फाउंडेशन बद्दलअथर्व फाउंडेशन हा अथर्व ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचा एक सामाजिक  उपक्रम आहे, जो कि श्री  सुनिलजी    राणे ( अध्यक्ष अथर्व फाउंडेशन आणि आमदार बोरिवली ) ह्यांच्या सक्षम नेतृत्वात   भारताच्या ग्रामीण भागात मुलींचे शिक्षण, शहीदांच्या कुटुंबियांना मदत, महिला सक्षमीकरण आणि खेळाडूंना त्यांच्या ध्येयाप्रत पुढे जाण्यास मदत करणे यासारख्या उदात्त उपक्रमांसाठी काम करण्यासाठी वचनबद्ध आहे.

अथर्व फाउंडेशननेही सर्व गरजू नागरिकांच्या कल्याणासाठी विविध वैद्यकीय सुविधांसाठी पुढाकार घेतला आहे. महिला, मुले आणि तरुणांना शिक्षण आणि प्रशिक्षण देणे हे आमचे उद्दिष्ट आहे जेणेकरून ते सन्मानाने  स्वावलंबी जीवन जगू शकतील.